हसतमुख अखेर!

vilasrao

(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख) वयाची ६७ वर्षे पार केली तरी विलासरावांच्या एकूणच शरीरयष्टीकडे आणि त्यांच्या कार्यक्षमतेकडे पाहल्यानंतर त्यांचे वय तितके असेल, यावर कुणाचा सहसा विश्वास बसणे शक्य नव्हते. वय एकवेळ लपविता येईल, पण आजार लपविता येत नसतो. आज विलासराव आपल्यात नाहीत, यावर म्हणूनच विश्वास बसत नाही. महाराष्ट्राने एक हसतमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावून नेले आहे. […]

Continue Reading

नंबर दोनचा प्रमेय

(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख) एक, दोन, तीन, चार… अशी कितीही गणती करीत राहिले, तरी ती संपणार नाही. अवघ्या जगात आज गणितंच मांडली जातात. कुणाला श्रीमंतीच्या व्याख्येला गणितात बसवायचं असतं, तर कुणाला पोटाची खळगी भरण्यासाठी गणित मांडावं लागतं. माणूस आनंदात असला की तारखा मोजतो आणि दुःखात असला की वर्षं! आनंदात त्याला प्रत्येक दिवस साजरा करावासा […]

Continue Reading
Mangal

मंगळ प्रवास

(8 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) ग्रहांचेही आपले एक सौंदर्य असते. कुणाला शुक्र भुरळ घालतो, तर कुणाला चंद्र. कुणाला कविता सुचतात, तर कुणाला पानभर लेख लिहावेसे वाटतात. लालचुटूक मंगळही याला अपवाद नाही. मंगळाचे रत्न मानले जाणारे पोवळे तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राला शोभा देते. आज जरी फॅशन नसली, तरी खेड्यांमध्ये आजही मंगळसूत्रात पोवळे असतेच. मंगळाचा ज्योतिषशास्त्रदृष्ट्या […]

Continue Reading
Anubhuti

अनुभूती…दैवी कणाची!

(8 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) खरोखर देव आहे काय? उत्तर येतं, माहिती नाही’. अनेक श्रद्धाळू सुद्धा आयुष्यातील अडचणींच्यावेळी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारत असतात. श्रद्धा असतेच, पण ती कधी डळमळतेही. शेवटी माणूसच ना तो? शेवटी एकच क्रोसिन सर्वांवर सारखाच परिणाम करीत नाही. कधी ती ताप बरा करते, तर कधी ऍलर्जीला कारणीभूत ठरते. असे असले […]

Continue Reading

लंडनला हवे अण्णा!

(2 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) अण्णा रविवारी उपोषणाला बसले आणि पाहता-पाहता जंतरमंतरवरील गर्दी वाढू लागली. काही प्रांत ज्याचे त्यानेच सांभाळायचे असतात. प्रयोगशीलता वाईट नाही. पण, प्रयोगाची कालमर्यादा मात्र निश्चित असली पाहिजे. किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगून केलेला प्रयोग लगेच सावरला गेला, ही आनंदाची बाब आहे. प्रश्न- अण्णा, केजरीवाल, […]

Continue Reading

बंदीची दुसरी बाजू!

(17 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) बंदी अर्थात सक्तीचे निर्बंध. त्याने समस्या सुटतात, असा दावा केला जातो. तो किती खरा आहे आणि किती खोटा, हे प्रत्येकाला ठावूक आहे. त्यामुळे त्यावर फार उहापोह करण्यात अर्थ नाही. काही प्रसंगात सक्ती आवश्यक असली तरी ती बहुतेक वेळा ज्वालामुखी बाहेर पडण्यास कारणीभूत ठरते, हा सामान्य अनुभव आहे. गेल्या आठवड्यात […]

Continue Reading

आधुनिक भीष्म

(12 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) असं म्हणतात की, इतिहास कायम घटनांची पुनरावृत्ती करीत असतो. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थखाते स्वतःकडे घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. भूक लागलेला ताट वाढल्यानंतर पटापट जेवतो, तशी त्यांची अवस्था आहे. अर्थमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा देताच जणू त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला आणि त्यांना निर्णय […]

Continue Reading

नियोजनातील फोलपणा!

(2 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) प्राचीन आणि आधुनिक हा वाद समाजाच्या बहुतेक क्षेत्रात आहे. त्याचा मेळ जे जुळवतात, ते सुखी असतात आणि जे एकालाच चिटकून बसतात, ते आयुष्याच्या कोणत्याही पातळीवर आणि कोणत्याही क्षेत्रात प्रगतीपासून वंचितच राहतात. व्हॉट वूई हॅव डन’ पेक्षा व्हॉट वूई कॅन डू’ चीच लढाई रोचक आणि यशाकडे नेणारी असते. आजचा विषय […]

Continue Reading

नोकरी करायची कशी?

(25 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) नोकरीत खूप प्रामाणिकपणे मेहनत करणे अनेकदा अंगावर शेकत असते. याचा अनुभव आयुष्यात अनेक जण घेत असतात. साधारणपणे कामचलावू पद्धतीने, प्रवाहाशी जुळवून घेत मार्गोत्क्रमण करणारे अनेक लोक असतात. त्यांच्या नोकरीचा कालखंड अतिशय चांगला जातो. सन्मानाने निवृत्त होण्याची संधी त्यांना मिळते. पण, कर्तव्य पार पाडण्यासाठी जोखीम घेत, व्यवस्थेशी शत्रूता पत्करत, प्रामाणिकता […]

Continue Reading

राज-परलोक!

(19 जून 2012 रोजी लिहिलेला लेख) देशात महागाईचा आगडोंब उसळत असताना, सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना, खिशाला कात्री लागत असताना, वैयक्तिक जीवनशैलीवर निर्बंध येत असताना, टीव्हीवर त्याच त्या मालिका पाहणेही कंटाळवाणे होत असताना अचानक राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि जनतेला थोडा दिलासा मिळाला. चर्चेला एक नवीन विषय मिळाला आणि आपले संविधानही एकदा तपासून पाहण्याची […]

Continue Reading